Friday 5 September 2014

पंतप्रधान मोदींचा आजच्या शिक्षकदिनाच्या भाषणातील काही ठळक मुद्दे... आवडले तर नक्की शेअर करा... भारत युवकांचा देश आहे, तरूणांना शिक्षक बनून चांगला समाज घडवण्याची इच्छा असली पाहिजे – कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या जीवनात, यशात त्याच्या आईचे आणि शिक्षकाचे मोठे योगदान असते. एकेकाळी शिक्षकांना जनमानसात मोठे आदराचे स्थान होते, पण आता परिस्थिती बदलली आहे – जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मिळून शाळेची सफाई करतात, मग आपल्याकडे असे होताना का दिसत नाही? तीव्र इच्छाशक्ती असेल तर मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही – विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे, आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. त्यामुळे आपण इतिहासाच्या जवळ जातो आणि सत्य जाणून घ्यायची आपली क्षमताही वाढते जीवन में खेलखूद नही, तो जीवन खिलेगा नहीं – आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आपण सतत शिकत राहीले पाहिजे – गुगल माहिती देऊ शकेल, ज्ञान नाही. त्यामुळे स्वत: वाचा आणि ज्ञान मिळवा – अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक असतो, असं म्हणतात. पण मी म्हणेन तुमचे संस्कार, शिक्षण आणि शिक्षक हेही तितकेच महत्वाचे असतात काहीतरी बनण्यापेक्षा काहीतरी करण्याचे स्वप्न पहा- मी हेडमास्टर नाही पण टास्कमास्टर आहे. मी कठोर मेहनत करतो आणि इतरांकडूनही करून घेतो – जपानमध्ये पालक मुलांना शाळेत सोडायला जात नाहीत, पण मुलं शाळेत जाताना दर २५ पावलांवर पालक उभे असतात. सर्वजण मिळून विद्यार्थ्यांचे संरक्षण करतात. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. त्यांच्यातील गुण शोधून त्यांना वाव देणं हे शिक्षकांचे काम आहे. मी शिक्षक असतो तर मी कोणत्याही विद्यार्थ्यांत भेदभाव केला नसता – आजकाल मुलांचे बालपण लवकर हरवत आहे – देशाच्या विकासासाठी मुलींना शिक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. एक मुलगी शिकल्यावर दोन कुटुंब साक्षर होतात शाळेत स्वच्छतागृहे नसल्याने मुली शिक्षण अर्धवट सोडून देतात – चांगले आचरण हीसुद्धा एकप्रकारे देशसेवाच असते.

No comments:

Post a Comment